पिंपरी-चिंचवड : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ (गवळीनगर) येथे ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ अभियान उत्साहात राबविण्यात आले. प्रभागातील नागरिक तसेच व्यापारी बांधवांना तिरंग्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आयोजकांचे कौतुक केले.
तिरंगा हा केवळ देशाच्या गौरवाचे प्रतीक नसून भारताची एकता, अखंडता, स्वाभिमान आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवून देशाप्रती असलेले प्रेम आणि कर्तव्य व्यक्त करावे, असे आवाहन करण्यात आले.
‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीची भावना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला. नागरिक, व्यापारी आणि परिसरातील विविध घटकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होत ‘जय हिंद’ आणि ‘जय महाराष्ट्र’चा जयघोष केला.
या उपक्रमाच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आला. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने दिसून आला.
“दमदार नगरसेविका” भिमाताई पोपटराव फुगे आणि “कामाचा माणूस” सम्राट पोपटराव फुगे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
