आळंदी (प्रतिनिधी): श्रीहरी गोविंद प्रतिष्ठाण, आळंदी येथील निधीचा कथित अपहार केल्याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २७८/२०२६ (मजकुरात २०२९ असा उल्लेख दिसत असला तरी नोंदीनुसार २६/०७/२०२६ रोजी गुन्हा दाखल) भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२),३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दि.२६ जुलै २०२६ रोजी दुपारी १३.५६ वाजता नोंदविण्यात आला.
याप्रकरणी अनिता भाऊसाहेब कवडे (वय ६४), अध्यक्षा, श्रीहरी गोविंद प्रतिष्ठाण, आळंदी यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी कीर्ती राजेश सोमाणी (वय ५०), राजेश रामेश्वर सोमाणी (वय 55) आणि कमलकिशोर मंत्री (वय ६५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीनुसार, दि.०२ सप्टेंबर २०२४ आणि ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी श्रीहरी गोविंद प्रतिष्ठाणतर्फे सद्गुरू रामेश्वर सोमाणी यांना आध्यात्मिक प्रचारासाठी मानधन म्हणून धनादेश देण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर संबंधित दोन धनादेशांचा आरोपींनी संगनमताने वापर करून संस्थेच्या ₹ ०२ लाखांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.