वारकऱ्यांसाठी स्वच्छता, आरोग्य आणि सुविधांचे नियोजन; स्वयंसेवी संस्थांचाही उत्स्फूर्त सहभाग
पिंपरी, प्रतिनिधी…..जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पालखी मार्गाच्या स्वच्छतेसाठी राबविलेली विशेष मोहीम यशस्वी ठरली. पालखीचे आगमन आणि प्रस्थानानंतर अवघ्या दोन तासांत संपूर्ण पालखी मार्ग व परिसर स्वच्छ करून शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्ववत करण्यात आली.स्वच्छता वारी’
वारीदरम्यान लाखो वारकरी शहरातून मार्गक्रस्वच्छता वारी’ मण करत असल्याने त्यांच्या आरोग्य आणि सुविधांचा विचार करून महापालिकेच्या आरोग्य विभागाने पालखी मार्गावर तात्पुरती स्वच्छतागृहे, स्नानगृहे आणि इतर आवश्यक सुविधा उभारल्या होत्या. या सुविधांची नियमित स्वच्छता, स्वच्छता वारी’ निर्जंतुकीकरण आणि देखभालही सातत्याने करण्यात आली.
महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करत पालखी मार्ग स्वच्छ ठेवला. या उपक्रमात सीवायडीए, बिसलेरी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल गव्हर्नमेंट, संस्कार प्रतिष्ठान, ईसीए, प्रतिभा कॉलेज, संजीवनी स्वयंसेवी संस्था, अंकुश फाऊंडेशन, ज्ञानगंगा फाऊंडेशन, अल्फा फाऊंडेशन, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, म्हाळसाकांत विद्यालय, ह्यूमन राईट्स असोसिएशन, संत निरंकारी मंडळ, निर्मल वारी, यशस्वी ग्रुप, आरंभ महिला बचत गट, यशोधरा महिला बचत गट, पिंची संस्था, निर्मल फ्लॉवर फाऊंडेशन, लाईट हाऊस कम्युनिटी फाऊंडेशन, उमंग फाऊंडेशन, गुणवंत कामगार मंडळ, पितृछाया ट्रस्ट आणि एस.एन.बी.पी. कॉलेजसह अनेक स्वयंसेवी व शैक्षणिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.
“वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख असून वारकरी बांधवांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली होती. प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त सहभागातून ‘स्वच्छ वारी’चा आदर्श निर्माण झाला.”
श्री.रवि लांडगे,महापौर पिंपरी चिंचवड
“स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, निर्जंतुकीकरण आणि तात्पुरत्या स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते. अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयामुळे ही मोहीम प्रभावीपणे यशस्वी झाली.”
डॉ. विजय सूर्यवंशी,महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड
अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करत विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे पालखी मार्गाची स्वच्छता वेळेत पूर्ण झाल्याचे नमूद केले.
“पालखी सोहळ्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात आला होता. तैनात स्वच्छता पथके, तात्पुरत्या स्वच्छतागृहांची नियमित देखभाल, निर्जंतुकीकरण आणि त्वरित कचरा उचल यामुळे वारकरी बांधवांना स्वच्छ व आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देता आल्या.”
डॉ. प्रदीप ठेंगल,उपआयुक्त (आरोग्य) पिंपरी चिंचवड
वारीनंतर तातडीने पालखी मार्ग स्वच्छ करून शहरातील दैनंदिन स्वच्छता व्यवस्था पूर्ववत करण्यात आली. ‘स्वच्छ वारी, सुंदर वारी’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने यंदाही वारकरी सेवेसह स्वच्छतेचा आदर्श कायम राखल्याचे या मोहिमेतून अधोरेखित झाले.
